यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी म्हटले आहे की भविष्यात नेहरू-गांधी सोडून काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतील.
त्यांनी 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना त्यामुळेच पंतप्रधानपदाची शपथ दिली करण ते सोनिया गांधींपेक्षा चांगले उमेदवार होते, असे सोनिया गांधी इंडिया टुडे’च्या कॉन्क्लेव्ह मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.
सोनिया गांधी म्हणाल्या की काँग्रेसमध्ये एक परंपरा आहे की नेते लोकशाही पद्धतीनेच निवडून येतात.
सोनिया गांधीनी 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून निवडले, कारण त्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव होती आणि त्यांना ठाऊक होते की ते चांगले उमेदवार आहेत. “मी माझ्या मर्यादा ओळखत होतो. मला माहित होते की मनमोहन सिंग माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान असतील” असे गांधी म्हणाले.
2004 मध्ये यूपीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही त्या पंतप्रधानपदी विराजमान का झाल्या नाहीत याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष उत्तर देत होत्या.
सोनिया गांधी मोडींबद्दल बोलताना म्हणाल्या की, केंद्रात काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही. “आम्ही परत सत्तेवर येणार आहोत. आम्ही त्यांना परत सत्तेवर येऊ देणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन