शेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्यात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची भावना होती. त्यातूनच दबावामुळे आमच्याकडून चुका झाल्या. लाभार्थ्यांना चुकीची प्रमाणपत्रं वाटप करण्यात आली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होतील, घाईमुळे घोळ झाला असला तरीही एकही पैसा वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी दिली आहे.
कर्जमाफी योजनेतील घोटाळे टाळण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाईन घेतली.
त्यांनी यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार असल्याचीही माहिती सभागृहात दिली. ते कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलत होते.
तुमची कमेंट लिहा..