धर्मवीर संभाजी: त्याग हिंदवी स्वराज्यासाठी
ज्या डोळ्यांना कधी इंद्रायणीच आणि भीमेच पाणी दिसणार नव्हत. ज्या डोळ्यांना आउसाहेबांची शाल जी त्या गेल्यावर पण राजेंनी राखून ठेवलेली आठवण म्हणून ती दिसणार नव्हती. त्याच डोळ्यांना आबासाहेबांची रायगडावरची समाधी दिसणार नव्हती न हे हिंदवी….ते हि दिसणार नव्हत . त्या तुटल्या जिभेने कुणाला ते हाक मारणार होते. रात्री मध्येच्या कवी कलशांनी आपले प्राण त्यागले होते. कानांच्या पाळ्यांनी कदीच आजूबाजूचा भेसूर सूर ऐकण बंद केल होत.कातड्यांच्या सोलवटलेल्या शरीरान सगळ सगळ दुखन हद्दपार केल होत. आणि शेवटच्या घडीला. जी तालावर माण्यातून थेट नरडीला चिरत गेली. त्या रक्ताचा पाऊस त्या वढू बुद्रुक च्या मातीत कुठेच आणि कधीच मिसळून गेला. आउसाहेब गेल्या.शिवराय गेले.मागोमाग कवी कलश आणि आता खुद्द संभाजी राजे. त्याग केला त्यांनी अमुल्य जीवाचा. त्याग केला राजाजी आणि आरामदायी आयुष्याचा. त्याग केला आपल्या लोकांसाठी . हिंदवी स्वराज्यासाठी. आणि आपण हि त्याग करतो. धर्मवीर संभाजी राजेंचा खरा इतिहास जाणून घेण्याचा. हे बरोबर आहे का ?
एक मनातली खदखद. शंभू राजे. जिथ असाल तिथ निट राहा.
लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: ७५५८३५६४२६
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.