सह्याद्री जिंकलाच पण समुद्राचं काय ?? उद्या जर दुसरी यवनी सत्ता गाठ-भेट घेऊन अजून एक दुसऱ्या परकीय सत्ते बरोबर ह्या उभारलेल्या स्वराज्यावर समुद्रावरून आक्रमण करायला आले मग काय करणार ??
त्यासाठी समुद्रावर आरमार ह्याची उभारणी आधी पासून हवीच. आज सिद्दी आहे जंजिऱ्यावर उद्या त्यांची खबर डच , ईस्ट इंडिया , फ्रेंच , आणि पोर्तुगीज कडे जाईल . आणि ते जर झालं तर त्यांची पण सेना बळकट होऊन कारखाने काढतील , जहाज बांधणी करतील , व्यापार करतील आणि आपल्याच लोकांना कामाला लावून स्वताची सत्ता स्थापन करतील .. म्हणून आज जर वेळ गमावला तर उद्या जीव गमावू आपण . हे टाळण्यासाठी आपल्याला फौजा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यास वाढवावी लागेल . जर रोखू शकलो परकीयांना तरच उद्या समुद्र आपला होईल .
छत्रपती शिवाजी राजे भोसले हे भारतात सर्वात पहिले राजे असे होते कि ज्यांनी समुद्री ताकद आधीच ओळखली होती .
जशी समुद्री आणि खाडीतल्या मिठाची गरज आपल्या लागते तसच , किनाऱ्यावर आणि समुद्रात छावणी उभारून साकार केलेले मराठा आरमार. राजा हा जळपती , म्हणजेच त्यातील पाणी , जमीन , लाकूड आणि दगड ( jala , sthala , kashta and pashana ) ह्याचा अधिकारी .