Why we give Shami leaf (aaptyachi pane) to each other on Dasara, Significance of Shami leaf on dasehra, Vijayadashmi Gold
दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोने घ्या चांदी द्या” म्हणत दसरा साजरा करत असतो. पण आपण आपट्याचीच पाने का वाटतो हे आपणास माहीत आहे का?
चला तर मग आज जाणुन घेऊया विजयादशमी तथा दस-याला सोनं म्हणुन आपट्याची पाने का वाटतात.
आपट्याची पाने तेजतत्व रुपी आहेत, त्याने वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आपट्याची पाने तम-रजात्मक असल्याने त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण वातावरणात शुद्धता निर्माण करतात.
या आपट्याच्या पानात ईश्वरी तत्वाचा वलय निर्माण होतो. त्यामुळे ती पाने एकमेकांना दिल्यावर दोन्ही व्यक्तींच्यात आनंदाचे व स्नेहपुर्वक संबंध निर्माण होतात अशी उदात्त भावना हिंदू परंपरेत आढळून येते. त्यामुळे दस-याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आपण दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोन घ्या सोन्यासारख रहावा” असे म्हणतो.
आपट्याची पाने दुसरी मान्यता
मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम ने लंकेवर हल्ला करण्यापूर्वी आपट्याच्या झाडाला वंदन करीत विजयासाठी प्रार्थना केली होती असे मानले जाते. भगवान श्रीराम ने आपट्याच्या पानांना स्पर्श केल्याने युद्ध जिंकले अशी मान्यता आहे. त्यामुळेच विजयादशमी दिवशु सुख, समृद्धि, आणि विजय मिळवण्यासाठी आपट्याच्या पानांना कालांतरात सोन्याचे स्थान मिळाले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप