आषाढी वारी बाबत मोठा निर्णय, कशी होणार यावर्षीची वारी

0
आषाढी वारी बाबत मोठा निर्णय, कशी होणार यावर्षीची वारी

आठ शतकांची परंपरा असलेल्या आषाढी वारी चा पायी सोहळा रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी संप्रदाय यांच्यात पुण्यामध्ये आज बैठक झाली. यामध्ये आषाढी वारी संदर्भात निर्णय घेण्यात आले.

कशी होणार यावर्षीची आषाढी वारी

आळंदी, देहू आणि सासवड येथील पादुका दशमीला पंढरपूर येथे एकदिवस आधी नेण्यात येणार आहेत. संतांच्या पादुका वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमान यापैकी कशानेही नेण्यात येतील. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पालखी संयोजक आणि प्रशासन या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढत प्रभाव लक्षात घेता पायी आषाढी वारी होणार नाही. आठशे वर्षांपासून चालू असलेली हि परंपरा साधेपणाने साजरी केली जाणार आहे.

यावर्षी आषाढी एकादशी 1 जुलै रोजी आहे. नियोजित वेळेनुसार 12 जून रोजी संत तुकाराम महाराज देहू यांच्या पालखीचे प्रस्थान होणार होते. तर 13 जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित होते. आता त्यात बदल करण्यात आलेला आहे.

परंपरेनुसार आषाढी एकादशी च्या सुमारे तीन आठवडे आधी संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित असते. यावर्षी पादुका थेट पंढरपूर ला घेऊन गेल्यामुळे पायी वारी परंपरा खंडित होणार आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता पायी वारी केल्यास संसर्ग वाढण्याची भीती वक्त केली जात होती.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.