भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 0.2 मृत्यू, जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात हेच प्रमाण 4.1 मृत्यू इतके

0
भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 0.2 मृत्यू, जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात हेच प्रमाण 4.1 मृत्यू इतके

आतापर्यंत 24 लाख नमुन्यांची चाचण्या पूर्ण

भारतीय स्वास्थ्य विभागाने आज सर्व आकडेवारी प्रकाशित केली आहे. यामध्ये मृत्यूदर , झालेल्या कोरोना टेस्ट हे आकडे प्रकाशित केले आहेत.

गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 2,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे, आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39,174 इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारतो आहे.

देशात  सध्या कोविड-19 चे 58,802 सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या एकूण रूग्णांपैकी सुमारे 2.9% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवाल क्रमांक 119 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांची यादी खालीलप्रमाणे आहे.

* 19th May, 2020 रोजीची ताजी आकडेवारी

चाचण्या

देशभरात काल विक्रमी 1,08,233 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण  24,25,742 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

भारतात जानेवारी महिन्यात कोविड-19 ची चाचणी केवळ एकाच प्रयोगशाळेत होत होती, आता मात्र आपण अत्यंत जलद गतीने आपल्या चाचणी क्षमतेत वाढ केली असून सध्या देशात 385 सरकारी तर 158 खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची सुविधा आहे. सर्व केंद्रीय सरकारी प्रयोगशाळा, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रे या सर्व ठिकाणची चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय, चाचण्यांना गती देण्यासाठी TrueNAT आणि CBNAAT  या आणखी दोन चाचणी किट्स विकसित करण्यात आल्या आहेत.

एम्ससारख्या 14 अग्रणी  वैद्यकीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील प्रयोगशाळांना पुरेशी जैव-सुरक्षा प्रमाणके आणि अधिस्वीकृती करण्यात मदत करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची साधने सतत उपलब्ध राहावीत यासाठी साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने, भारतीय टपाल आणि खाजगी संस्थांच्या मदतीने 15 डेपो विकसित करण्यात आले आहेत. आधी चाचण्यांची साधने आपण आयात करत होतो, आता मात्र अनेक भारतीय कंपन्यांना ही साधने बनविण्यासाठी पाठबळ दिले जात आहे, यामुळे चाचणीची पुरेशी साधने देशात उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.