शनिवारी क्रिकेट अंध विश्वचषक स्पर्धेत भारताने आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारिमुंडया चित करत पराभवाची चव दाखवत विश्वषचकावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला आहे. पाकिस्तानने फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी बलाढ्य ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार करत विश्वचषक आपल्या नावावर केला.
सुनील रमेश ने ९३ धावा आणि अजय रेड्डी च्या ६२ धावांच्या जोरावर भारताने हा विजय साकार केला. भारताने ३८.२ षटकात आठ गडी गमावून हे आव्हान पार केले.
#BlindCricketWorldCup ?: Captain of Indian?team Ajay Kumar Reddy dedicates World Cup to #IndianArmy.@adgpi pic.twitter.com/cvCRY9T8R5
— All India Radio News (@airnewsalerts) January 20, 2018
भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. या विजयाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.