नुकताच फर्जंद या चित्रपटाने सर्वांना कोंडाजी फर्जंद यांच्याविषयी ची माहिती सर्वांना करून दिली. शिवाजी महाराजांची पन्हाळगड सर करायची इच्छा कोंडाजी फर्जंद हा शूरवीर पूर्ण करतो.
तर कोण होता कोंडाजी फर्जंद, कोंडाजी फर्जंद इतिहास काय सांगतो हे जाणून घेऊयात.
कोंडाजी फर्जंद Kondaji Farzand पन्हाळगड लढाई
अवघ्या साठ मावळ्यानिशी महाकाय पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर कोंडाजी फर्जंद. तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड शिवाजी राजांनी ताब्यात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता. शिवाजी राजेंनी आपली ही सल दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद नावाचा मावळा राजेंना वचन देतो की गड म्या घेतो. फर्जंद यांनी अवघे तीनशे मावळे राजेंकडे मागितले. तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड सर करायला निघालेल्या कोंडाजी फर्जंद चे महाराजांनी कौतुक करत सोन्याचे कडे भेट म्हणून दिले. कोंडाजीची खरी परीक्षा सुरू झाली होती, त्यांनी राजेंना दिलेले वचन सत्यात उतरवायचे होते.
कोंडाजीने एक योजना आखली, त्यात कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ ठोकला. राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने अवघे ८०-९० कि.मी होते. हेरगिरीने कोंडाजीने आधीच किल्याची माहिती काढली होती. गडावर अंदाजे दोन हजार गनिम असल्याची माहिती कोंडाजींना मिळाली होती. आदिलशाही किल्लेदार बाबूखान हा पन्हाळ्याचा किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी (दि.६ मार्च १६७३) रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन कोंडाजी गडाच्या जवळ पोहोचला. तीनशे मावळ्यापैकी निवडक साठ मावळ्यांना घेऊन गडावर कड्यावरून चढून त्यांनी गडात प्रवेश केला. मध्यरात्री मराठ्यांनी गडात प्रवेश करत गनीमांना कापायला सुरुवात केली. पन्हाळा गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी फर्जंद यांच्यात तुंबळ युध्द झाले. अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे बाबूखानाच्या सैन्यात गोंधळ उडाला. ते पळून जाऊ लागले. परंतु कोंडाजी फर्जंद बरोबर आलेल्या साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड सारखा महाकाय गड ताब्यात घेणारा कोंडाजी फर्जंद खरोखरच महापराक्रमी होता.
कोंडाजी फर्जंद जंजिरा लढाई:
प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पळवायचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
- संभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई, Sambhaji Maharaj Portuguese War
- पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे अवघ्या ६० मावळ्यानीशी पन्हाळगड काबीज केलेल्या कोंडाजी फर्जंद याला. कोण होता हा कोंडाजी फर्जंद? आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी फर्जंद यांचा मुलगा म्हणजे कोंडाजी. संभाजी राजांनी कोंडाजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४०/५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण यात शंभुराजे आणि कोंडाजी यांचा डाव होता.
संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी कामासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडाजी फर्जंदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडाजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
कोंडाजी कडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडाजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडाजी फर्जंद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडाजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.
मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.
पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधत मराठ्यांच्यावर आक्रमणाचा डाव साधला. त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंगजेेेबाने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.
त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.
तर हा होता कोंडाजी फर्जंद यांचा इतिहास…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.