मराठा आरक्षण मुद्यावर काल महाराष्ट्रभर मराठा समाजाने एकत्र येत महाराष्ट्र बंद करत चक्काजाम आंदोलन केले. एस टी बसेस, खाजगी ट्रॅव्हल वाल्यांनी सुद्धा आपली सेवा बंद ठेवल्याने कायम गजबजलेले रस्ते ओस पडलेले पाहायला मिळाले.
महाराष्ट्र बंद
या आंदोलनात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळाले. शिर्डी पासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावरील पिंपरी निर्मळ या गावात मराठा आंदोलकांनी एक वेगळे आंदोलन केले. चार-पाच हजार मराठा आंदोलकांनी एकत्र येत नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या मांडला, तिथेच गॅस शेगड्या पेटवून शिरा,मसाले भात असे जेवण तयार केले. गावातील लोकांनी घराघरातून काहींनी बाजरी, काहीजणांनी ज्वारी आणि चपात्या,आमटी अशी आपापल्या परीने व्यवस्था केली.
महामार्गावरच आंदोलकांनी पंगती मांडल्या आणि जेवण थाटले. या आंदोलनाचे फोटो सर्वत्र वायरल झाले असून असं अनोखं आंदोलन प्रथमच पाहायला मिळालं.
महाराष्ट्र बंद हा यशस्वी झाला असून काही ठिकाणच्या घटना वगळता आंदोलन सुरळीत पार पडले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Top 10 Digital Marketing Courses in Pune with 100% Placement Assistance
The Famous Tea Seller Yewle Tea House from Pune City Earns 12 lakh per Month
महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास