महाराष्ट्र सायबर शाखा सक्रिय झालेली आहे. लॉकडाउन नंतर सोशल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा व द्वेषयुक्त पोस्ट केल्याबद्दल एकूण १३२ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेने गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २० एफआयआर नोंद केल्या आहेत. नोंदणीकृत २० प्रकरणांपैकी १४ जातिय तेढ निर्माण करणारे असून ६ कोरोनाव्हायरस संबंधित अफवा आहेत.
गेल्या ५ दिवसात सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण आणि जातिय तेढ निर्माण करणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आणि एकूण १३२ मध्ये सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाबद्दल ४९ प्रकरणे नोंदली गेली आहेत. ३५ आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. त्यातील २८ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र सायबर शाखा कडून वारंवार अफवा आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या ५ दिवसात सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण आणि जातिय तेढ निर्माण करणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आणि एकूण १३२ मध्ये सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाबद्दल ४९ प्रकरणे नोंदली गेली आहेत. ३५ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ जणांची ओळख पटली आहे| (2/n)@MahaDGIPR @DGPMaharashtra
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) April 8, 2020
Whatsapp ग्रुप admin यांना सुद्धा सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
हे राजकीय गुंड नेते, मंञी लोक द्वेषयुक्त वक्तव्ये करतात, मग त्यांना अशी वक्तव्ये करन्यासाठी आरक्षण देन्यात आले आहे का?