कोरोना व्हायरस (साथीचा रोग) चा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाउन अंमलबजावणी करण्यात आलेली असताना जिल्हा साहिबाबाद पोलिसांपुढे आश्चर्य व्यक्त करणारी घटना घडली. आपल्या मुलाला किराणा सामान घेण्यासाठी पाठवले असता तो पत्नीसह घरी परत आल्याची तक्रार घेऊन आई पोलिसांकडे आली होती.
“मी आज माझ्या मुलाला किराणा आणण्यासाठी दुकानात पाठवले होते, पण जेव्हा तो परत आला, तेव्हा तो आपल्या पत्नीसह परत आला. मी हे लग्न स्वीकारण्यास तयार नाही,” असे आईने सांगितले.
गुड्डू या 26 वर्षीय वराने सांगितले की, “माझे दोन महिन्यांपूर्वी सविताशी हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात लग्न झाले होते.” “त्यावेळी, साक्षीदारांच्या अभावामुळे आम्हाला त्यावेळी लग्नाचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. मी माझ्या लग्नाच्या दाखल्यासाठी पुन्हा हरिद्वारला भेट देण्याचे ठरवले होते, परंतु लॉकडाउन लागू केल्यामुळे तसे करणे शक्य झाले नाही,” असे वर म्हणाला.
“हरिद्वारहून परत आल्यानंतर सविता दिल्ली येथे भाड्याच्या घरी राहिली. मात्र, आज मी तिला आईच्या घरी आणण्याचे ठरविले कारण तिला लॉकडाऊनमुळे भाड्याने दिलेले घर सोडण्यास सांगण्यात आले.”
कौटुंबिक कलहाचा तोडगा काढत साहिबाबाद पोलिसांनी दिल्लीतील सविताच्या घराच्या मालकाला लॉकडाऊन कालावधीत त्या दोघांना तिथेच राहू देण्यास सांगितले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.