शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतील आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना गळाला लावलं आहे.
त्यानंतर सोशल मीडियावर या मुद्द्यावरून अनेक जण आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. अनेकांनी शिवसेनेनं उचलेल्या या पावलावर टिका केली आहे.
तर, बऱ्याच जणांनी राज ठाकरेंनी आता तरी पक्ष संघटनेबाबत विचार करण्याची वेळ आल्याचं मत व्यक्त केलं आहे.
तर, काहींनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढण्यावर लक्ष केंद्रीत केलं मात्र पक्षात काय चाललं आहे, याकडे लक्ष दिलं नाही, असं म्हटलं आहे.
फेसबुक, ट्विटर यांवर अनेकांनी आपापली मत नोंदवत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेबाबत आपापली भूमिका मांडली आहे.
ट्विटर वर त्यांच्या समर्थनार्थ तसेच खिल्ली उडवण्यात सुद्धा सर्व अग्रेसर होते.
धेय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल, त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा तुमची झाली पाहिजे!#घोडेबाजार#RajThackeray #सत्ताकारण
— प्रशांत निकम (@NikamSpeaks) October 13, 2017
थांब जरा दाखवतो ह्यांना!
व्यंगचित्रच काढतो आणि फेसबूकवर टाकतो! #RajThackeray ???— Ganesh Bhaiya ?? (@ganeshmpandey) October 13, 2017
I’m sure @mnsadhikrut will bounce back from this blow.. #RajThackeray keep fighting.. we need leaders like you and #mns aswell
— vikit d. jage (@iVJOmniscient) October 13, 2017
एक मात्र नक्की या #सहा जणांची पोरं आयुष्यात कधीच छाती ठोकून सांगू शकणार नाही की आमचा #बाप इमानदार आहे..!#RajThackeray
— pritish pravin kolte (@KoltePritish) October 13, 2017
निष्ठेची विष्ठा झाली एवढं मात्र खरं.#RajThackeray
— snehil shivaji (@snehilshivaji) October 13, 2017
#cartoon #MNS #ShivSena #BJP #Rane pic.twitter.com/J70LCibUv8
— alok nirantar (@caricatured) October 14, 2017
जेव्हा दिवाळी आली आणि तरी देखील तुम्ही जर दिवाळी बोनस देत नसाल तर मनसे नगरसेवक कसे सोडून गेले तसे लोक जातील
— Mumbaicha Engineer (@berozgaarhoo) October 14, 2017
फेरीवाले 15 दिवसात उठले पाहिजे , त्याची धास्ती घेऊन मनसे चे घरचे फेरीवाले उठले। सुरुवात घरापासून झाली। अगदी योग्य झालं ।
— Ritesh Sawant (@ritzsawant) October 14, 2017
सोशल मीडियावर कायम संमिश्र प्रतिक्रिया येतच असतात. त्यातल्या ह्या काही….