केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान हुतात्मा, दोन दहशतवादयांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी भल्या पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीफचे पाच जवान शहीद झाले आहेत, या हल्ल्यात अजून दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सुरक्षा दलांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देत दोन दहशतवादयांना यमसदनी धाडले. ANI च्या वृत्तानुसार हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
काँग्रेसची नरेंद्र मोदींवर टीका:
पुलवामा येथील हल्ला म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याची टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुषमा देव यांनी केली आहे.